
जळगाव, दि.१० (जनसंवाद live): महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, पशुधनाचे व शेतीचे अतोनात नुकसान झाले असताना शासन निकष लावून मदत देण्याचे नाटक करत असून शेतकरी बांधवांच्या झालेल्या नुकसान न भरून निघण्यासारखे आहे. त्यामुळे शासनाने कोणतेही निकष न लावता संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा कोणत्याही मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला. शुक्रवार दि. १० रोजी जिल्हाधिकारी यांना जळगाव जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशात शासनातर्फे निकष लावण्याचे काम सुरू असून ही शेतकऱ्यांची थट्टाच सुरू असल्याचे मत महाविकास आघाडी च्या नेत्यांनी व्यक्त केले. दुपारी जिल्हाधिकारी महोदय यांना महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे संपूर्ण जिल्हा म्हणजेच वगळलेले 11 तालुक्यांचा देखील समावेश करावा ही मागणी केली. जर संपूर्ण जळगाव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही. असा इशाराही देण्यात आला. याप्रसंगी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे निरीक्षक भास्कर काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, राष्ट्रवादी काँग्रेस महानगर अध्यक्ष एजाज मलिक, विकास पवार, मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ, जगतराव पाटील, एडवोकेट सचिन पाटील, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, उपमहा नगर प्रमुख प्रशांत सुरळकर, मजहर पठाण, रमेश पाटील, विश्वनाथ पाटील, वाय एस महाजन, लक्ष्मण पाटील, भिका पाटील, संजय पाटील, एन. डी. पाटील, राजेंद्र पाटील, विश्वजित पाटील, आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




