
जळगाव, दि.७ (जनसंवाद live): डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) ७ नोव्हेंबर सन १९०० मध्ये पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला होता. त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर २०१७ रोजी घेतला. त्या अनुषंगाने ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. अति उच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही बाबासाहेबांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले. त्यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले.

आज सकाळी जळगाव रेल्वे स्टेशन जवळील भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला आंबेडकरी जनतेतर्फे माल्यार्पण करून विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी चेतन नन्नवरे, जयसिंग वाघ, हरिश्चंद्र सोनवणे, ॲड आनंद कोचुरे, प्रा. प्रितीलाल पवार, बाबुराव वाघ, सतीश गायकवाड, आशिष सपकाळे, सुभाष सपकाळे, बागुल साहेब, तायडे साहेब, यशवंत मोरे, अभय सोनवणे, मुकुंद सपकाळे, आदी उपस्थित होते.
भंते सुबोधा थेरो यांनी उपस्थितांना पंचशील दिले. त्रिशरण पंचशील नंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. जयसिंग वाघ, प्रा. प्रितीलाल पवार, आशिष सपकाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन बाबुराव वाघ यांनी केले.





